अंगणवाडी सेविका संप : राज्यभरात गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला यश आले आहे. अंगणवाडी सेविकांच्या पगारात 1500 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला आहे. याशिवाय सेवाोत्तर पेन्शन योजनाही सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय मोबाईल फोनही दिला जाणार आहे.
कामाचे मानधन कमी असल्याने राज्यातील अंगणवाडी सेविकांनी संपाचे हत्यार उपसले. यापूर्वीच्या आंदोलनावेळी राज्य सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने अंगणवाडी सेविकांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. 20 फेब्रुवारीपासून पुकारलेल्या संपाची तीव्रता वाढत होती. अंगणवाडी सेविका व मदतनीस 20 फेब्रुवारीपासून ते बेमुदत संपावर आहेत. हा संप अंगणवाडी सेवा, वर्षानुवर्षे कार्यरत असणा-या सेविका , राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची अट, पगारात भरघोस वाढ, न्यायालयाच्या आदेशानुसार पदवी, मासिक पेन्शन, नवीन मोबाईल फोन आदींसाठी पुकारण्यात आला आहे.
आपल्याला हेही वाचायला आवडेल
अंगणवाडी सेविकांचे आजपासून या ठिकाणावर ठिय्या आंदोलन
अंगणवाडी सेविका यांच्या संपात आता यांची ऊडी, मागण्या मान्य करा नाहीतर आम्हीही संप करू
अंगणवाडीत मिळणार २० हजार महिलांना नोकरी, ३१ मे पर्यंत चालणार भरती प्रक्रिया
या संपाचा आज नववा दिवस असून संपाची तीव्रता वाढत आहे. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग आणि अंगणवाडी सेविकांना तुटपुंजे मानधन देऊन राज्य सरकार चुकीचे करत असल्याचे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील दोन लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका राज्यातील लाखो बालकांचे पोषण, शालेय पूर्व शिक्षण, गरोदर मातांची काळजी अशी महत्त्वाची कामे करत आहेत, मात्र केंद्र व राज्य सरकार त्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे.
दरम्यान, मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असलेल्या अंगणवाडी सेविका संपामुळे सरकारला घाम फोडला. कुंभकर्णी झोपेत असलेल्या राज्य सरकारला जाग आली. या आंदोलनामुळे अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या असून पगारवाढीशिवाय मार्ग नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.